"राज"कारण की "पवार"प्ले.
कालच राज ठाकरेंच्या पक्षाचे नव्या झेंड्याचे अनावरण झाले,"हा भगवा पहिल्यापासून मनात होता पण लोकाग्रहास्तव मी झेंड्यात तीन रंग घेतले" अस राज साहेब कितीही म्हटले तरी ते न पटणारे आहे,त्यावेळेची पक्ष भूमिका ही शिवसेनेच्या हिंदुत्वा पेक्षा वेगळी असावी हे नक्कीच ठरले असणार कारण फक्त हिंदुत्वावर राज ठाकरेंना पक्ष उभे करणे अवघडच होते,त्यामुळेच बहूजन समाजाचा निळा,हिंदूंचा भगवा आणि मुस्लिम समाजाचा हिरवा त्यांनी झेंड्यात निवडला,त्याचा फायदा त्यांना नक्कीच झाला,आणि एकूण 40-45 आमदार त्यांनी निवडून आणले, दुर्दैवाने म्हणा किंवा डोक्यात हवा जाणे म्हणा ह्या आमदारांनी पाहीजे तसे काम काही केले नाही,त्यात मनसे चे सर्वाधिक लोकप्रिय गोल्ड मॅन रमेश वांजळे कालवश झाले,पण ह्या नंतर राज ठाकरेंनी अनेक सभा घेतल्या भाषणे केली पण तेव्हापासून आजतागायत पक्षाला काही जनतेचा कौल भेटला नाही, कालचे त्यांचे भाषण ऐकताना वारंवार जाणवत होते की मनसेने सध्याचे वातावरण पाहून जाणून बुजून हिंदुत्वाचा मुखवटा घालायचा प्रयत्न केलाय,वारंवार मुस्लिम समाजा बद्दलचा होणारा उल्लेख हा मुद्दाम केला जातोय किंवा बळेच आणलेले अवसान आ...